तळोजे प्रतिनिधी:
वारकरी संप्रदायातील एक समर्पित व्यक्तिमत्व, सदगुरू वामनबाबा महाराज यांचे अनन्य भक्त आणि तळोजे मजकूर(ता. पनवेल) परिसरातील ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. रामदासबाबा गोपाल पाटील यांचे आज शुक्रवार ८/५/२०२६ रोजी सकाळी ८ वाजता वृद्धापकाळाने वैकुंठगमन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पनवेल तालुका आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
रामदास बाबा पाटील हे गेल्या अनेक दशकांपासून वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. सदगुरू वामनबाबा महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी अत्यंत निष्ठेने जपला होता. तळोजे परिसरात अध्यात्माचा प्रसार करण्यात आणि तरुण पिढीला वारकरी परंपरेची गोडी लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या साध्या राहणीमुळे आणि मृदू स्वभावामुळे ते सर्वत्र ‘बाबा’ म्हणून आदराने ओळखले जात.
अध्यात्म आणि समाजसेवेचा संगम केवळ भजन-कीर्तनापुरते मर्यादित न राहता, बाबांनी सामाजिक कार्यातही नेहमीच पुढाकार घेतला. गावातील धार्मिक उत्सव असो किंवा वामनबाबा महाराजांची पालखी सोहळा, रामदास बाबांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती अनिवार्य असे. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक आणि निष्ठावंत भक्त हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अंत्यसंस्काराला जनसागरत्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि वारकरी संप्रदायातील भाविकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. “राम कृष्ण हरी” च्या गजरात आणि शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आणि शिष्यगण असून, वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाल्याचे बोलले जात आहे.









