परभणी / प्रतिनिधी :-
जिंतूर येथील पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार म्हणून परिचित असलेले शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. वय वर्ष 60 त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली पत्नी असा त्यांचा परिवार त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख मोहम्मद एजाज़ भाई यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. पत्रकारितेतील त्यांच्या कार्यामुळे त्यांनी समाजात वेगळी छाप निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ईश्वर अल्लाह त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना व्यक्त होत आहे. आमीन.






