गडचिरोली प्रतिनिधी
देसाईगंज ते कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनी मोरगाव पॉईंट, शंकरपूर तसेच इतर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश दिले.
खराब रस्त्यांमुळे दररोज वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यावेळी माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्रजी बुल्ले, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, नगरसेवक तथा गटनेते विकास प्रधान, नगरसेवक राजूभाऊ रासेकर, सामाजिक कार्यकर्ते विलास बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते कमलेश बारस्कर, कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर, कनिष्ठ अभियंता अमित रामटेके, राजलक्ष्मी प्रोजेक्टचे डायरेक्टर पराग केसरकर, वरुण देव शर्मा आदी उपस्थित होते.


