• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याला नवसंजीवनी ; १० कोटींच्या विकासकामांना गती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याला नवसंजीवनी ; १० कोटींच्या विकासकामांना गती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

नळदुर्ग | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे एक ऐतिहासिक स्थान असून,येथे असलेला नळदुर्ग किल्ला हा प्रमुख आकर्षण आहे.हा किल्ला प्राचीन काळातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो.किल्ल्याची मूळ उभारणी कल्याणीच्या चालुक्य काळात झाल्याची नोंद आहे.त्या काळात चालुक्यांची राजधानी असलेल्या कल्याणी शहराच्याजवळ असल्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व होते.सुरुवातीला हा किल्ला मातीचा गढीवजा होता.यानंतर बहामनी सत्तेच्या काळात या किल्ल्याचे रूपांतर भक्कम दगडी बांधकामात करण्यात आले.इ.स. १३५१ ते १४८० या कालावधीत बहामनी सुलतानांनी या किल्ल्याचा विस्तार केला.पुढे आदिलशाही काळात किल्ल्याचे नाव ‘शहादुर्ग’ असे ठेवण्यात आले.इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या कारकीर्दीत इ.स.१६१३ मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून ‘पाणी महल’ची निर्मिती करण्यात आली.हा पाणी महल त्या काळातील स्थापत्यशास्त्र व अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे.

RelatedPosts

पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा किल्ला हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत गेला आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्याच ताब्यात राहिला. निजाम शासनाच्या १२ जानेवारी १९५३ च्या अधिसूचनेनुसार किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक घोषित केले.राज्य पुनर्रचनेनंतर हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आला असून त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागामार्फत केले जाते.

विभागीय निधी अंतर्गत व्यापक विकास आराखडा :

नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार,या स्मारकाचा ‘महावारसा विशेष स्मारक योजना’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.या कामासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी रुपये १० कोटी ८७ लक्ष ५५ हजार ६९८ रुपये इतक्या रकमेचा सविस्तर विकास आराखडा तयार केला आहे.हा प्रस्ताव दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

या आराखड्यातील प्रमुख कामे पुढीलप्रमाणे आहेत :

स्मारक परिसरातील झाडेझुडपे काढणे,शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन, तटबंदीचे मजबुतीकरण,दगडी पायऱ्या व गार्ड रेलिंग,रणमंडल भागातील तटबंदीची दुरुस्ती,भेगा पडलेल्या भिंतींना ग्राऊटिंग,पाणी महल व उपळी बुरुज परिसरातील दुरुस्ती,दगडी पाथवे निर्माण, पर्यटकांसाठी दिशादर्शक फलक, स्मारकाचे दस्तऐवजीकरण,इतर पूरक कामे आदी कामांचा समावेश आहे.

Tags: Suraj Kamble
Previous Post

पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

Related Posts

पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक
ताज्या घडामोडी

पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

May 13, 2026
0
प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले
ताज्या घडामोडी

प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

May 13, 2026
0
वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे
ताज्या घडामोडी

वाढत्या तापमानाच्या संकटावर ‘पिक विविधता’ हा उत्तम पर्याय – डॉ. जीवन कतोरे

May 13, 2026
0
वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर
ताज्या घडामोडी

वाहतूक पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे; नियमभंग करणाऱ्यांवर आता डिजिटल नजर

May 13, 2026
5
सेलू येथे लवकरच स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होणार
ताज्या घडामोडी

सेलू येथे लवकरच स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होणार

May 13, 2026
2
वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिकांमध्ये संताप
ताज्या घडामोडी

वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिकांमध्ये संताप

May 13, 2026
0

ताज्या बातम्या

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याला नवसंजीवनी ; १० कोटींच्या विकासकामांना गती

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याला नवसंजीवनी ; १० कोटींच्या विकासकामांना गती

May 13, 2026
पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

पिपरी पुनर्वसनची कल्याणी तेटू ठरली नोबेल किड्स स्कूलची गुणवंत विद्यार्थीनी; दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

May 13, 2026
प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’वर सूचना फलक उभारले

May 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In