एसएससी परीक्षेत श्री जितोबा विद्यालयाची चमकदार कामगिरी
जिंती | प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील जिंती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालयाने एसएससी फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९६.१५ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला उजाळा दिला आहे.
यावर्षी परीक्षेसाठी एकूण २६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ओम रत्नराज रणवरे याने ९३.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अर्णव मारुती रणवरे याने ८९ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. नम्रता सागर वाघमारे हिने ८७.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच कु. जिया अखिल तांबोळी (८७.४०%), प्रणित सचिन रणवरे (८५.४०%), प्रणय प्रवीण रणवरे (८४.२०%), सार्थक विकास रणवरे (७९.४०%) आणि कु. वैष्णवी अमोल भिसे (७५.६०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



