• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिक विमा प्रश्नासाठी आमदार किसनराव वानखेडे यांचा पाठपुरावा; कृषिमंत्र्यांची मुंबईत भेट
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि उत्पादन घट यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी पिक विमा योजना यंदा मात्र यवतमाळ जिल्ह्याला लागू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. किसनरावजी वानखेडे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

यापूर्वी त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची सविस्तर माहिती दिली होती. यवतमाळ हा कृषिप्रधान जिल्हा असून येथील बहुतांश शेतकरी सोयाबीन, कापूस आणि खरीप पिकांवर अवलंबून आहेत. हवामानातील बदल, अतिवृष्टी, पावसाचा खंड तसेच कीडग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

त्यानंतर आज मुंबई येथे राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांची आमदार किसनरावजी वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी यवतमाळ जिल्ह्याला पिक विमा मदतीच्या यादीत समाविष्ट करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाच्या मदतीची त्यांना नितांत गरज असल्याचे आमदार वानखेडे यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेक गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिक विमा योजनेचा मूळ उद्देश संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणे हा आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी पिक विमा संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करून यवतमाळ जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले.

“माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका आमदार किसनरावजी वानखेडे यांनी मांडत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आता शासनाच्या निर्णयाकडे आशेने पाहत असून, पिक विमा मदत जाहीर झाल्यास हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Tags: Ram Hamad
Previous Post

शेतकरी आत्महत्या समितीवर पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड

Next Post

वाघोली येथे विहिरीत बिबट्या पडल्याने खळबळ

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
167
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

वाघोली येथे विहिरीत बिबट्या पडल्याने खळबळ

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In