• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बदलत्या हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; वारंवार वीज खंडित होण्याने त्रासात भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

रिसोड : प्रतिनिधी

रिसोड शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे. सकाळी अवकाळी पाऊस, दुपारी प्रचंड उष्णता आणि रात्री ढगाळ वातावरण अशा सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे.

RelatedPosts

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गेल्या दहा दिवसांत सर्दी, खोकला, ताप, उलटी-जुलाब, डिहायड्रेशन तसेच व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका बसत आहे. काही रुग्णांमध्ये उष्माघाताची लक्षणेही आढळून येत आहेत.

डॉक्टरांच्या मते, तापमानातील अचानक बदलामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत असून पाऊस आणि उष्णतेच्या मिश्र परिणामामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, रिसोड शहरात वारंवार चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीज नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये टायफॉईड, मलेरिया आणि व्हायरल आजारांच्या रुग्णांची गर्दी वाढताना दिसत आहे.

नागरिकांनी विद्युत महामंडळाने तातडीने लक्ष घालून नियमित वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. तसेच वातावरणातील बदल आणि वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागानेही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांसाठी डॉक्टरांचा सल्ला :

  • दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे
  • बाहेर पडताना पाणी आणि छत्री सोबत ठेवावी
  • उकळलेले व स्वच्छ पाणी प्यावे
  • उघड्यावरचे अन्न टाळावे
  • परिसरात पाणी साचू देऊ नये
  • लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी
Previous Post

राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट

Next Post

व्हेंटिलेटर बंद पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू? महिला व बाल रुग्णालयातील गंभीर हलगर्जीपणाचा आरोप

Related Posts

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश
ताज्या घडामोडी

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

May 21, 2026
0
येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला गती; संपूर्ण रस्त्याचे होणार नव्याने डांबरीकरण

May 21, 2026
63
ताज्या घडामोडी

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

May 21, 2026
27
ताज्या घडामोडी

यावल शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; काही पेट्रोल पंप बंद, उर्वरित ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा

May 21, 2026
43
चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा
ताज्या घडामोडी

चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

May 21, 2026
9
जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श
ताज्या घडामोडी

जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श

May 21, 2026
10
Next Post
व्हेंटिलेटर बंद पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू? महिला व बाल रुग्णालयातील गंभीर हलगर्जीपणाचा आरोप

व्हेंटिलेटर बंद पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू? महिला व बाल रुग्णालयातील गंभीर हलगर्जीपणाचा आरोप

ताज्या बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

May 21, 2026
कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

May 21, 2026
युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून धर्मवीरांना आगळे वेगळे अभिवादन

युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून धर्मवीरांना आगळे वेगळे अभिवादन

May 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In