बारामती, जि. पुणे
बारामती शहरातील कऱ्हा नदी शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः मंदिरात दर्शनासाठी येणारे वयोवृद्ध नागरिक तसेच परिसरातील विद्यार्थी या मार्गाचा नियमित वापर करतात.
मात्र, या रस्त्यावर काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. जवळच कदम क्लासेस असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन बाबूजी नाईक वाडा ते श्री स्वामी समर्थ मंदिर या चौकात लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसवावा, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या मते, स्पीड ब्रेकर उभारल्यास वाहनांच्या वेगावर नियंत्रण येऊन अपघातांना आळा बसण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.










