श्रीगोंदा : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ” संकल्प ते सिद्दी” या देशव्यापी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र भाजपच्या वतीने आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची प्रदेश सहसंयोजक निवड करण्यात आली.
अभियानाचा मुख्य उद्देश मोदी सरकारच्या ऐतेहासिक कामगिरीची , लोक कल्याणकारी योजनेची आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेची माहिती महाराष्ट्रातील तळागाळातील आणि शेवटच्या घटकातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध जिल्हा व शहर पातळीवर विशेष कार्यशाळा ,संवाद सत्रे आणि जनता दरबार आयोजित करून 90 दिवसाचे विशेष नियोजन करण्यात आलेले आहे.
या निवडीमुळे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचेवर संघटनात्मक पातळीवर आणि शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या निवडीमुळे पाचपुते यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे .








