सारथी महाराष्ट्राचा
येवला प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या येवला-मनमाड रस्त्याच्या कामाला अखेर प्रशासनाकडून मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला वेग आला आहे. हा रस्ता केवळ ठिगळ लावून दुरुस्त केला जाणार नसून संपूर्ण रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे.
सध्या रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम तसेच साईड पट्ट्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असून कामाला गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण डांबरीकरण होणार असल्याने हा रस्ता अधिक मजबूत आणि चकाचक होणार आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता नव्याने रस्ता तयार होत असल्याने वाहनधारक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामामुळे वाहतुकीला दिलासा मिळणार असून अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









