गंगापूर (प्रतिनिधी) :
“बोलावे तसे चालावे, त्यांची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे दिलेला शब्द पाळत नरहरी राजनगाव ते पेहरकर वस्ती या रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांना या रस्त्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मा. सभापती प्राध्यापक वालतुरे सर तसेच अप्पासाहेब पाटील हिवाळे (मा. कमिटी संचालक) यांच्या प्रयत्नांतून या रस्त्याच्या कामाला गती मिळाली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर मार्गी लागली आहे.
या रस्त्यामुळे पेहरकर वस्ती व परिसरातील नागरिकांना ये-जा सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी नवनाथ सुरासे, नेवरती बाराहाते, शिवाजी वायकर, शुभम बाराहाते, गंगाधर पाटील म्हस्के, नवनाथ म्हस्के, नवनाथ नाईक, नामदेव पेहरकर, गणेश म्हस्के, अनिल म्हस्के, पंडित पाटील मडलीक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







