• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रकल्प दोडामार्गात, वीज मात्र दुसऱ्या राज्यात! कराराअभावी ऐन पावसाळ्यात तालुका अंधारात जाण्याची भीती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

दोडामार्ग/प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यात उभारण्यात आलेल्या ‘महालक्ष्मी विद्युत प्रकल्पा’ची वीज सध्या तालुक्यालाच मिळत नसून ती दुसऱ्या राज्याला पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महावितरण आणि प्रकल्प प्रशासन यांच्यातील करार संपून तब्बल तीन वर्षे उलटूनही तो अद्याप पूर्ववत न झाल्याने आगामी पावसाळ्यात संपूर्ण दोडामार्ग तालुका अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशीच परिस्थिती सध्या दोडामार्गवासीयांची झाली आहे.

RelatedPosts

अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

समीर शेख बीडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

सध्या दोडामार्ग तालुक्यातील सासोली सबस्टेशनला ३३ केव्ही इन्सुली लाईनवरून वीजपुरवठा केला जातो. मात्र ही लाईन अत्यंत कुचकामी ठरत असून साधा वारा, पाऊस किंवा विजांचा कडकडाट झाला तरी लाईन तत्काळ ट्रिप होते. परिणामी संपूर्ण तालुक्याला तासनतास अंधाराचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते.

यापूर्वी महालक्ष्मी विद्युत प्रकल्पातून दोडामार्ग तालुक्याला सुरळीत वीजपुरवठा केला जात होता. मात्र महावितरण आणि प्रकल्प प्रशासनातील करार संपुष्टात आल्यानंतर गेली तीन वर्षे हा प्रश्न रखडलेलाच आहे. प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वतःच्या तालुक्यात प्रकल्प असूनही येथील नागरिकांना विजेपासून वंचित राहावे लागत असून, इथली वीज मात्र दुसऱ्या राज्याला विकली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत महालक्ष्मी प्रकल्पातून तात्पुरता वीजपुरवठा देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्वी मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात तालुक्यात अंधार पडल्यानंतर संबंधित अधिकारी मोबाईल ‘स्विच ऑफ’ करून ठेवतात किंवा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाळा तोंडावर असताना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोडामार्गचे तहसीलदार, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून महावितरण आणि महालक्ष्मी प्रकल्प प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन वीज करार पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा ऐन पावसाळ्यात दोडामार्ग तालुक्याला कायमस्वरूपी अंधाराचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू

Next Post

नरहरी राजनगाव ते पेहरकर वस्ती रस्त्याच्या कामास सुरुवात; ग्रामस्थांमध्ये समाधान

Related Posts

अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू
ताज्या घडामोडी

अहिल्यादेवींचे नाव जामखेड नगरपरिषदेला देण्यासाठी साखळी उपोषण सुरू

May 22, 2026
2
समीर शेख बीडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक
ताज्या घडामोडी

समीर शेख बीडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

May 22, 2026
1
NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी
ताज्या घडामोडी

NEET पेपर फुटीचे धागेदोरे अंबाजोगाईत; सीबीआयकडून दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

May 22, 2026
0
वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन
ताज्या घडामोडी

वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन

May 22, 2026
53
नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

May 21, 2026
6
सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा
ताज्या घडामोडी

सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

May 21, 2026
42
Next Post

नरहरी राजनगाव ते पेहरकर वस्ती रस्त्याच्या कामास सुरुवात; ग्रामस्थांमध्ये समाधान

ताज्या बातम्या

श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये विकासकामांना कासवगती; समन्वयाअभावी कामे रखडली

May 22, 2026
समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी

May 22, 2026
चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In