• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाशी हायवे ब्रिजवर धावत्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी दुर्घटना टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाशी हायवे ब्रिजवर धावत्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी दुर्घटना टळली
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

नवी मुंबई प्रतिनिधी:

नवी मुंबईतील वाशी हायवे ब्रिजवर आज एक धक्कादायक घटना घडली. पुण्याहून गुजरात मधील राजकोटच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मनीष ट्रॅव्हल्स या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच महामार्गावर काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले

RelatedPosts

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी लक्झरी बस वाशी हायवे ब्रिजवरून जात असताना अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरण्याचे आवाहन केले. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. चालकाच्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाशी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर बसला लागलेली आग आटोक्यात आणली. या आगीत बसचे प्रचंड नुकसान झाले असून बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.वाहतूक काही काळ विस्कळीत, आगीचे कारण अस्पष्टया भीषण आगीमुळे वाशी हायवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती आणि रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर हायवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस जास्त गरम झाल्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Tags: Shrinath Laad
Previous Post

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

Next Post

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मनसेतर्फे बालग्राम आश्रमात फळे वाटप; मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Related Posts

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

May 24, 2026
0
पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

May 24, 2026
1
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

May 24, 2026
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती

May 24, 2026
0
३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी
ताज्या घडामोडी

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

May 24, 2026
5
धोंदलगाव येथे डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड; खरीप हंगामावर संकटाची छाया
ताज्या घडामोडी

धोंदलगाव येथे डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड; खरीप हंगामावर संकटाची छाया

May 24, 2026
0
Next Post
अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मनसेतर्फे बालग्राम आश्रमात फळे वाटप; मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मनसेतर्फे बालग्राम आश्रमात फळे वाटप; मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

म्हसावद येथील मिलिंद अहिरे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ जाहीर

म्हसावद येथील मिलिंद अहिरे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ जाहीर

May 25, 2026
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

May 25, 2026
किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

May 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In