श्रीरामपूर , (प्रतिनिधी) : ‘जनगणना २०२७’ च्या राष्ट्रीय मोहिमेत श्रीरामपूर तालुक्याने बाजी मारली आहे. शिरसगाव ग्रामीण च्या प्रगणक स्मिता गोकुळसिंग जमादार यांनी संपूर्ण तालुक्यात सर्व प्रथम घर गणना पूर्ण केली.
गट क्रमांक ००८५ मधील घरांची नोंदणी अचुक व विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश इंगळे, पर्यवेक्षक राजेश घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा सहपरिवार गौरव करण्यात आला.
देशभरात सध्या जनगणनेच्या पुर्व तयारीचा धडाका सुरु आहे काम वेळेत व बिनचूक पार पाडणे हे प्रत्येक प्रगणकापुढील मोठे आव्हान आहे. मात्र, स्मिता जमादार यांनी नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि चिकाटीच्या जोरावर हे आव्हान पेलले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया जमादार यांनी दिली. राष्ट्रिय कर्तव्य पार पाडताना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची प्रेरणा मिळाली, तर नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश इंगळे, ट्रेनर योगेश राणे, गणेश पिंपळे , पर्यवेक्षक राजेश घोरपडे यांचे मार्गदर्शन मिळाल्याने क्लिष्ट काम वेळे आधीच पूर्ण करु शकले असे त्या म्हणाल्या.
प्रगणक हे जनगणनेचे खरे शिलेदार आहेत , अचुक माहिती, लोकांशी संवाद आणि प्रामाणिक काम हीच यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक प्रगणकाने आत्मविश्वासाने काम करावे, मार्गदर्शनासाठी आम्ही मास्टर ट्रेनर नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत, असे गणेश पिंगळे यांनी सांगितले..









