• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कारंजा बायपासवर पुन्हा चोरीची घटना; ऑटो ॲपेमधील गाडीची काच फोडून ७५ हजारांची रोकड लंपास

Rudra by Rudra
May 27, 2026
in Blog
0
कारंजा बायपासवर पुन्हा चोरीची घटना; ऑटो ॲपेमधील गाडीची काच फोडून ७५ हजारांची रोकड लंपास
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

कारंजा बायपास | तालुका प्रतिनिधी जी.के. सारथी महाराष्ट्रचा

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

कारंजा बायपास परिसरात पुन्हा एकदा चोरीची धक्कादायक घटना घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारच्या सुमारास बायपास येथील गुप्ता सुपर शॉपी समोर उभ्या असलेल्या ऑटो ॲपेमधील वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पातुर नंदापूर येथील एका शेतकऱ्याने आपली बैलजोडी विक्री करून मिळालेली ७५ हजार रुपयांची रोकड सोबत घेतली होती. काही कामानिमित्त तो कारंजा बायपास परिसरात आला होता. दरम्यान, गुप्ता सुपर शॉपी समोर वाहन उभे करून तो काही वेळासाठी बाहेर गेला असता, संधी साधून अज्ञात चोरट्यांनी वाहनाची काच फोडली आणि आत ठेवलेली रोकड घेऊन पसार झाले.

घटना लक्षात येताच शेतकऱ्याने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, कारंजा बायपास परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, व्यापाऱ्यांनी व वाहनधारकांनी पोलिस प्रशासनाकडे वाढीव सुरक्षा व्यवस्था, नियमित गस्त आणि संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, बैलजोडी विकून आणलेली मेहनतीची रक्कम चोरीला गेल्याने संबंधित शेतकरी हतबल झाला असून, “कष्टाने कमावलेले पैसे क्षणात गेले” अशी व्यथा त्याने व्यक्त केली. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्येही संतापाची लाट पसरली आहे.

Previous Post

वेळेत जनगणना केल्या बद्दल जमादार यांचा गौरव

Next Post

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
1
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
2
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
1
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
7
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
34
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
2
Next Post
श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In