प्रेस – नोट …
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी , आयटकचे ८ जून पासुन नागपूरातील मुख्यमंत्री सचिवालयासमोर लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन .
नागपूर,(२५ मे ) – महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनाने वेळोवेळी मान्य केलेल्या आणि अन्य प्रलंबित मागण्यांची त्वरीत पुर्तता करावी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरील होणारा आर्थिक अन्याय थांबाविण्यात यावा ,या मागणीसाठी आयटकशी संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने नागपूरातील सिव्हिल लाईन, हैद्राबाद हाऊस स्थित मुख्यमंत्री सचिवालय येथे येत्या ८जून२०२६पासुन राज्यव्यापी “बेमुदत धरणे आंदोलन ” करण्यात येणार आहे . अशा आशयाचे निवेदन आज दि. २५ मे रोजी मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव श्रीमती आशा पठाण ( निचत ),नागपूर विभागीय आयुक्त आणि स्थानिक शहर पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात आले .
शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची अंमलबजावणी करावी म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचा गृह जिल्हा असलेल्या साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महासंघाच्या वतीने गतवर्षी धरणे आंदोलन आणि मोर्चा तसेच १० डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. त्यापूर्वी जिल्हा व विभागीय पातळीवर अनेकदा आंदोलने करून सुद्धा ग्रामविकास मंत्री आणि त्यांच्या विभागाकडून कोणतीही दखल न घेता,
योग्य प्रतिसाद दिल्या जात नाही .त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये सरकारप्रती प्रचंड नाराजी आणि असंतोष पसरला आहे .गावाच्या विकासात अत्यंत महत्वाची भूमिका असलेल्या आणि तुटपुंज्या पगारावर कामे करणाऱ्या ग्रामीण कर्मचाऱ्यांवरील होणारा आर्थिक अन्याय थांबवावा . तसेच शासनाने वेळोवेळी मान्य केलेल्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेऊन राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, याकरिता नागपुरात हे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे .आपल्या हक्कासाठीच्या आणि ८ जून२०२६ पासुन लोकशाही मार्गाने होणाऱ्या या बेमुदत धरणे
आंदोलनात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचारी क्रमाक्रमाने आणि मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. कॉ . तानाजी ठोंबरे, कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, सरचिटणीस नामदेव चव्हाण, सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे,ए .बी.कुलकर्णी, राहुल जाधव, बबन पाटील, शाम चिंचणे, निळकंठ ढोके, हरिशचंद्र सोनवणे, सुधीर टोकेकर,वसंत वाघ, तुकाराम भस्मे, उज्वल गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे .
कृपया, बातमी आपल्या वृत्त पत्रातून प्रसिद्ध करावी, ही विनंती .










