दिपक गजभारे..
नायगाव तालुका प्रतिनिधी..
नायगाव : तालुक्यातील घुंगराळा येथे गेल्या पाच वर्षापासून सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दलित वस्तीमध्ये कुठलाच विकास केला नाही, दलित वस्ती सुधार योजना ही फक्त कागदावरच आहे. विहाराचे काम ही अपूर्णच व काही कामे असतील नसतील याची माहितीही घेतली नसल्याची स्पष्ट नागरिकांनी सांगितले.
गेले चार पाच वर्ष झाले दलित वस्ती मधील नाल्या कचऱ्याने तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे याकडे ग्रामपंचायत मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.जागोजागी ड्रेनेज उघडे ठेवून पाण्याचा उतार न काढल्यामुळे नालीतच पाणी साचत असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचे ही सांगितले. वारंवार ग्रामसेवक सरपंच यांना सांगूनही नालीचे काम अपूर्णच आहे. दलित वस्ती सुधार योजना असो व वस्ती सुधार योजनेसाठी जिल्हा परिषद व सामाजिक न्याय विभागाकडून लाखो करोडो रुपयांच्या निधी येत असतात मात्र घुंगराळा येथे आज पर्यंत पाच वर्षात कोणतेही कामे केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.जागोजागी पाण्याची ढिगारे
,कचऱ्याचे ढीग ,नाल्या तुटून गेलेल्या,रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. लाईटचा हायमॅक्स फक्त नावालाच गेले एक वर्ष झाले बल्ब बसवण्यात आले नाही, फुटकी नाली त्यात पाणी साचलेले त्यातच मच्छरच्या प्रादुर्भाव स्वच्छ पाणी नाही.वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन घुंगराळा येथील दलित वस्ती सुधार योजने च्या झालेल्या कामाची व निकृष्ट कामाची तपासणी करून दोषी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही संतप्त नागरिकांनी केली. सरपंच पदाचा कार्यकाळ संपताच ग्रामपंचायत च्या निधीतून लाखो रुपयांची उचल केली असून काम मात्र शून्य अशी घुंगराळा ग्रामपंचायत ची परिस्थिती आहे.कामे कागदावर दाखवून त्यातच निधी उचलून सरपंच व ग्राम विकास अधिकारी ची मनमानी कुठवर चालणार अशी चर्चा नागरिक करत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर कामाची व घुंगराळा ग्रामपंचायतची तपासणी करावी अशी मागणी घुंगराळा येथील नागरिकांनी केली.











