प्रतिनिधी
संबंधित रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने आणि रडतखडत सुरू असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. खराब रस्त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढत असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी तसेच संबंधित कंत्राटदाराला रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदराम धिकार यांनी केली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य स्थितीत करण्यात आला नाही, तर नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
रस्त्याच्या निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.










