परभणी / प्रतिनिधी
शहरातील रमाबाई आंबेडकरनगर येथे २६ मे रोजी पाच घरांना आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनास्थळी परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांनी भेट देऊन चौकशी केली. तसेच पन्नास हजारांची वैयक्तिकरित्या मदत केली. तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही.
आग लागलेल्या पाच घरांना झळ बसली असून या आपदग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या वतीने मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
महापौर सय्यद इकबाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून काही कालावधी लोटला असून दिवस-रात्र नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे, हेच आपले आद्य कर्तव्य असल्याचे ते सांगत आहेत. शहराच्या इतिहासात प्रथम शहरवासीयांसाठी चांगले महापौर लाभले आहेत.
दरम्यान, आग विझविण्यासाठी प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक सागर गंगाळे, मिलिंद बामणीकर यांच्यासह स्थानिक नगरसेवकांचे सहकार्य लाभले.










