गेवराई प्रतिनिधी –
गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथे बकरी ईदच्या रात्री हनुमान मंदिरातील मूर्तीची काही समाजकंटकांकडून जाणूनबुजून विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणी गोरक्षनाथ संस्थानचे दत्ता बाबा गिरी यांनी चकलांबा पोलीस स्टेशन येथे भेट देत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा प्रकारांमुळे गावातील शांतता आणि सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावामध्ये मराठी समाजाची संख्या कमी असून काही घटकांकडून दबाव टाकून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे. गावात शांतता कायम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











