कळमनुरी/सतीश पंडित
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..
भारतीय जैन संघटना घेणार बारावीपर्यंत शिक्षणाची संपूर्ण मोफत जबाबदारी
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींना शैक्षणिक पुनर्वसनासाठी भारतीय जैन संघटनेच्या महाराष्ट्र वतीने संवेदनशील व महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे
संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राज्यअध्यक्ष केतन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू असून पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्रात मोफत प्रवेश दिला जाणार आहे या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रवेश देऊन 0 त्यांचे शिक्षण भोजन निवास ड्रेस शैक्षणिक साहित्य तसेच इतरआवश्यक सुविधा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहे मागील दोन वर्षाखालील आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी सहावी व सातवी मध्ये आत्ता प्रवेश घेत असलेल्या मुला मुलींना या प्रकल्पात प्रवेश देण्यात येणार असून त्यांचे बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण भारतीय जैन संघटनेमार्फत विनामूल्य करून घेण्यात येणार आहे यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त करून घेण्यात आली आहे
भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवक संबंधित कुटुंबाच्या गावागावात सरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन जाऊन प्रत्यक्ष भेट घेणार असून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या योजनेची सविस्तर माहिती व व्हिडिओ छायाचित्रीकरण माध्यमातून सविस्तर समजावून सांगण्यात येणार आहे इच्छुक व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाने या शैक्षणिक पुनर्वसन योजनेचा लाभ घेण्याकरिता 31 मे2026 पूर्वी जिल्हा समन्वय प्रकाशचंद सोनी ,जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रेमेंद्र बोथरा , जिल्हा सचिव कुलदीप मास्ट, समन्वयक एडवोकेट मनीष साकळे, अतुल burse तेजूकुमार झांजरी पारसमल जैन, हेमंत संघई, दीपक सावजी , राजकुमार वडजाते रत्नाकर महाजन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे









