सध्याच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमध्ये संवादाचा अभाव, गैरसमज आणि छोट्या-छोट्या कारणांमुळे निर्माण होणारे वाद हे अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळतात. याच वास्तवावर भाष्य करणारा “नात्यांना आणि काय हवं” हा हृदयस्पर्शी मराठी लघुपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
या लघुपटामध्ये नवरा-बायकोच्या नात्यातील भावनिक चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. किरकोळ कारणांमुळे एकमेकांपासून दूर गेलेले दाम्पत्य काळाच्या ओघात नात्याचे महत्त्व ओळखते कि नाही ?
नात्यांमध्ये अहंकारापेक्षा प्रेम, विश्वास आणि संवाद अधिक महत्त्वाचा आहे कि नाही?
या सर्व प्रश्नांची उत्तरे या लघुपटा मधून उलघडली जाणार आहे
स्वराज फिल्म प्रस्तुत या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रकाश भिमराव भोसले यांनी केले असून, सह-दिग्दर्शन व कला दिग्दर्शन रसिका आंबेकर यांचे असून, प्रमुख भूमिकांमध्ये राणी परेरा आणि शैलेश पाचकुडे झळकणार आहेत.
“खरंच नाते सांभाळताना एवढी अपेक्षा ठेवावी का?” हा विचार प्रेक्षकांसमोर मांडणारा हा लघुपट नातेसंबंधांचे वास्तव आणि त्यातील भावनिक पैलू प्रभावीपणे उलगडून दाखवणार आहे. कौटुंबिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
लवकरच ही लघुपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.











