उंबरी बाळापूर, ता. संगमनेर (प्रतिनिधी)
गावाच्या विकासाला चालना देणारे आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून सन्माननीय मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेल्या घोलप वस्ती ते पोलीस पाटील वस्ती रस्ता मजबुतीकरण या विकासकामाचे भूमिपूजन आज उंबरी बाळापूर येथे जनसेवा मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या रस्ता मजबुतीकरणाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. अखेर या विकासकामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
भूमिपूजन कार्यक्रमास प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन रामभाऊ पाटील भुसाळ, माजी सरपंच भिकाजी खेमनर, भागवतराव उंबरकर, सोसायटीचे माजी चेअरमन गोपीनाथ भुसाळ, संचालक रंगनाथ पा. उंबरकर, शिवाजी भुसाळ, भागवतराव खेमनर, राधाकिसन चोपडे, आरपीआय तालुकाध्यक्ष आशिषभाऊ शेळके, ॲड. सुनील जुंधारे, सुरेश भुसाळ, ताराचंद भुसाळ, मच्छिंद्र खेमनर (जानकर), अनिल बर्डे, युवा कार्यकर्ते निलेश निर्मळ, गणेश भुसाळ, राजू घोलप, गोकुळ खेमनर, भाऊ घोलप, भरत भुसाळ, लक्ष्मण जुंधारे (कृषी सहाय्यक) यांच्यासह रस्त्याचे लाभार्थी व उंबरी बाळापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणी, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच या रस्त्याच्या कामामुळे गावातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून विविध विकासकामांना चालना दिल्याबद्दल माननीय डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
गावाच्या प्रगतीसाठी सुरू असलेला विकासाचा हा प्रवास आगामी काळातही अशाच जोमाने सुरू राहो, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.










