• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

अडावद : चोपडा तालुक्यातील अडावद येथे अनिश्चित पाऊस, शेतीतील अस्थिरता आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा गंभीर यांच्याकडे सुमारे पाच एकर कोरडवाहू शेती होती. मागील वर्षी मक्याच्या पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. यंदा चांगले उत्पादन मिळेल या आशेने त्यांनी कर्ज काढून शेतीची तयारी केली होती. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली.

घेतलेले कर्ज कसे फेडायचे, शेतीचे नुकसान कसे भरून काढायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेतून ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. अखेर १४ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या गच्चीवरून उडी घेत आपले जीवन संपवले.

घटनेनंतर त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. १५ जून रोजी शवविच्छेदनानंतर अडावद येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, हवामानातील अनिश्चितता आणि कर्जबाजारीपणाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Tags: Maheshprasad Dikshit
Previous Post

दुधनी जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Next Post

डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाची प्रकृती गंभीर

Related Posts

ताज्या घडामोडी

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

June 16, 2026
0
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम
ताज्या घडामोडी

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

June 15, 2026
64
ताज्या घडामोडी

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

June 15, 2026
55
ताज्या घडामोडी

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

June 15, 2026
14
ताज्या घडामोडी

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

June 15, 2026
19
ताज्या घडामोडी

शेलारवाडीत वाघाच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी; वन विभागाकडून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

June 15, 2026
35
Next Post

डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाची प्रकृती गंभीर

ताज्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 16, 2026

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

June 16, 2026

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In