• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

जलसंधारण विभागांतर्गत शिरोळ उपविभागीय पाटबंधारे उपविभाग, शिरोळ-कुरुंदवाड शाखेकडून पंचगंगा नदीवरील इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान लागू करण्यात आलेली उपसा बंदी तातडीने उठवावी, अशी मागणी पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रकाश येसने यांना निवेदन सादर करण्यात आले.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. बहुतांश गावांमध्ये नदीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसून त्याऐवजी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नदीतील उपलब्ध पाण्याचा वापर मुख्यत्वे शेतीसाठीच केला जात आहे.

मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान अचानक उपसा बंदी लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून वाढत्या उन्हामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे साहित्य व तयारी करून ठेवली असून, अशा परिस्थितीत सिंचनासाठी पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी नेते धनाजी चूडमुंगे आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली. “प्रोसेस व सायझिंग उद्योगांचा पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र शेतीसाठी पाणी बंद केले जात आहे. पंचगंगेतील सांडपाणी पुढे कृष्णा नदीत मिसळत असून त्याचा उपयोग पिण्यासाठी कोणीही करत नाही. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी वापरण्यास परवानगी द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पंचगंगा नदीवरील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत असल्या तरी नदीचे पाणी रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. जलसंधारण विभागाच्या परिपत्रकानुसार धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा वगळता इतर वापरांवर बंदी घालण्याचा नियम आहे. मात्र पंचगंगा नदीचे पाणी आधीच पिण्यास अयोग्य असल्याने शेतीसाठी उपसा बंदी लावणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उपसा बंदीमुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होणार असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान लागू करण्यात आलेली उपसा बंदी तातडीने हटवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

यावेळी धनाजी चूडमुंगे, दिपक पाटील, प्रभाकर बंडगर, बंडू बरगाले, राकेश जगदाळे, गोपाळ चव्हाण, रावसाहेब गवळी, सर्जेराव बाबर आदी शेतकरी उपस्थित होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Next Post

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In