• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पाटबंधारे विभागाकडून शेती पंपांवर अचानक उपसा बंदी लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. यावेळी उप कार्यकारी अभियंता प्र. म. येसने यांची भेट घेऊन उपसा बंदीचा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

RelatedPosts

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

“स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून अनेक ठिकाणी ऊस लागवड तसेच भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र उपसा बंदीमुळे सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, “उपसा बंदीचा आदेश पिण्याचे पाणी वगळता इतर सर्व वापरांसाठी लागू असल्याचे सांगितले जात आहे. मग औद्योगिक वापरासाठी पाण्याला सूट का दिली जात आहे?” असा सवाल उपस्थित केला.

शेतकऱ्यांनी पुढे स्पष्ट केले की, इचलकरंजीपासून पुढे पंचगंगा नदीवरून कोणत्याही गावाचा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे इचलकरंजीपासून नरसिंहवाडी संगमापर्यंत लागू करण्यात आलेली उपसा बंदी मुळात चुकीची असून ती तातडीने उठवावी.

उपसा बंदी कायम ठेवल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, गोपाळ चव्हाण, बंडू बरगाले, प्रभाकर बंडगर, गोवर्धन माने, आनंदा भातमारे, कमिल इनामदार, शिवाजी काळे, अनिल हुपरीकर, संभाजी माने यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

Next Post

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

Related Posts

ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
3
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
0
ताज्या घडामोडी

“स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

June 18, 2026
0
ताज्या घडामोडी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीत 99.79 टक्के मतदान

June 18, 2026
3
ताज्या घडामोडी

महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचा जागर; डी.जे.पी.एस. कॉलेज ऑफ फार्मसी, पाथरी येथे जयंती उत्साहात साजरी

June 18, 2026
1
ताज्या घडामोडी

तोहीद खान हत्या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी

June 18, 2026
0
Next Post

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

ताज्या बातम्या

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

June 18, 2026

मेळघाटात बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन; २५० शेतकऱ्यांना विविध बियाण्यांचे वाटप

June 18, 2026

सावली बेघर निवारा केंद्रात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन’ साजरा

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In