शहादा | प्रतिनिधी
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर’ आणि आयोजन समिती, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा साहित्य सोहळा शहादा-लोणखेडा बायपास रोडवरील पाटीदार सांस्कृतिक मंडळाच्या पाटीदार मंगल कार्यालय (पाटीदार लॉन), जि. नंदुरबार येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान पार पडणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान आमदार राजेश पाडवी भूषविणार आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून गोवर्धन तेलंग तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पद्मा जाधव-वाखुरे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून रमेश शंकर चौधरी मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, राहुल पाटील, अभिजीत पाटील, माधवी पाटील, दत्तात्रय सोमजी पाटील, मकरंद पाटील, विजय लिमजी पाटील, दीपक पुरुषोत्तम पाटील आणि रमाकांत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१० पुस्तकांचे प्रकाशन
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनातर्फे प्रकाशित १० पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
प्रातिनिधिक काव्यसंग्रह
- महाराष्ट्र माझा
- आम्ही काव्यसारथी
- काव्यमंजिरी
- विद्रोही वादळ
- देव्हारा (बालकाव्यसंग्रह)
वैयक्तिक ग्रंथ
- आठवणींचे पाखरे – गणेश पाटील
- आनंदाची शाळा – गणेश पाटील
- आयुष्य हे – कुसुमलता वाकडे
- झुळूक वाऱ्याची – कुसुमलता वाकडे
- गुज मनाचे – पुरुषोत्तम ठोंबरे
राज्यस्तरीय कवी संमेलनाची रंगत
दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कवी संमेलन होणार असून महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले कवी-कवयित्री कविता सादर करणार आहेत.
या संमेलनात डॉ. पद्मा जाधव-वाखुरे, शर्मिला देशमुख-घुमरे, कुसुमलता वाकडे, राजश्री मिसाळ ढाकणे, सविता धमगाये, व्ही. एस. गायकवाड, डॉ. मंजूषा साखरकर, अंजू येवले, हर्षा सहारे, मायादेवी गायकवाड, प्रा. डॉ. गोविंद चौधरी ‘देव’, पांडुरंग घोलप, अकील बाबा पठाण, वर्षा मोटे पंडित, सुलोचना लडवे, गणेश पाटील, शैलेश गायकवाड, अंकुश सालपे आदी नामवंत कवी सहभागी होणार आहेत.
तसेच नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक कवी-कवयित्रीही या संमेलनात सहभाग नोंदवणार आहेत.
मराठी साहित्याचा हा भव्य सोहळा अनुभवण्यासाठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
