बाबु कोकाट यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शेतीमित्र’ पुरस्कार प्रदान
गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील शेतकरी मित्र बाबु (त्रिंबक) कोकाट यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुधवार, दि. १ जुलै रोजी मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र तसेच एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश असे होते. यावेळी बाबु कोकाट यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे, राज्याचे कृषीभूषण पुरस्कार विजेते प्रकाश पाटील, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच राज्यभरातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.
बाबु कोकाट यांनी गेल्या सात ते आठ वर्षांपासून संध्या मल्टी सर्व्हिसेस व सीएससी केंद्रामार्फत “युवा शेतकरी मित्र” संकल्पनेअंतर्गत शेतकरी हिताची विविध कामे केली आहेत. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक जाधवर, तंत्र अधिकारी मगर व वाघ, कृषी विज्ञान केंद्र खामगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हनुमान गरुड, गेवराई तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, अभयकुमार वडकुते, मंडळ कृषी अधिकारी मस्के, सहाय्यक कृषी अधिकारी सुहास शिंदे, सूरपम, बीजी सीएससीचे दिनेश जाधव, वैभव डोंगरे, उपकृषी अधिकारी श्रीराम पवार, प्रकाश वाघमारे, आत्मा विभागाचे पठाण, काळे, जोशी, शिंदे, घोडके तसेच शेतकरी बांधव व मित्रपरिवाराकडून बाबु कोकाट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
