श्रीरामपूर | प्रतिनिधी
विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत श्रीरामपूर शहरातील तृतीयपंथी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शंभर टक्के गणना पत्रांची पूर्तता केली. या उपक्रमातून लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि सक्रिय सहभाग अधोरेखित झाला.
प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी स्वतः तृतीयपंथी आश्रमाला भेट देऊन प्रत्येक मतदाराचे गणना पत्र भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या विशेष उपक्रमामुळे लोकशाहीतील सर्वसमावेशकता, सामाजिक समता आणि प्रत्येक घटकाचा सहभाग अधिक दृढ झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी गुरु पिंकी शेख, दिशा शेख, खुशी शेख, निवडणूक शाखेचे संदीप पाळंदे तसेच संबंधित बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित होते.
एसआयआर मोहिमेत तृतीयपंथीय मतदारांचा शंभर टक्के सहभाग नोंदवल्याबद्दल प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून, सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
