
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारीत वाढ झाली असून नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत २२ टक्के होती. ती डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत २५ टक्के झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या ६१३ गुन्ह्यांमध्ये ६८३ आरोपी अटक करण्यात आले आहेत. एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, केंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे..
Discussion about this post