अकोट: (डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी)
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी अकोट येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चाचा तहसील कार्यालयावर धडकून समारोप करण्यात आला. बिहार सरकारचा १९४९ चा व्यवस्थापन समितीचा कायदा रद्द करून, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या प्रमुख मागण्यासाठी राष्ट्रपती व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व भिक्कु बुध्ददिप, भिक्कु धम्मपाल, भन्ते दिपकर व चरण इंगळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोट व महासचिव रोशन पुंडकर यांनी केले. यावेळी अकोट तालुक्यातील व शहरातील हजारो बौद्ध बांधव सहभागी झाले. तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, धिरज सिरसाट, निलेश झाडे, सुरेंद्र औइंबे, गौतम पंचांग, डॉ. ज्ञानेश्वर मानकर, गजानन दौंड, भीमराव तायडे, आशिष रायबोले, अमन गवई, सचिन सरकटे, राजपाल बडगे, शेषराव सरकटे, मनोहर गाडे, लताताई कांबळे, सुभाष घनबादूर, योगेश आग्रे, सुनीताताई वानखडे, विकी धांडे, सचिन सुपासे, विनोद पळसपगार, दादू निताळे, नितीन वानखडे, नितीन वाघ, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, उमेश लबडे, राहूल धाडे, सरपंच दिगंबर पिंपराळे, रामभाऊ भास्कर, मनोहर शळके, प्रशांत मानकर,शेषराव सरकटे, सदिप सरकटे,श्याम शेंडे, कपिल पोटे, राहुल लावडे, प्रमोद सोनोने पुष्पा ठोके, अरुणा परखने, करुणा तेलगोटे, माधुरी तेलगोटे, युवराज मरकुटे, सागर गहल्ले, संजय बूथ, सुयग आठवले,तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सुरेश गवई, महासचिव मिलिंद तेलगोटे, प्रकाश धांडे, प्रफुल धांडे, पुरुषोत्तम लबडे, पुरुषोत्तम भटकर,अनिल बिहाडे, सुनील वानखडे राजेश गावंडे, प्रदीप चोरे, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, विद्वत सभा, वंचित बहुजन महिला आघाडी, युवक आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी व बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.

Discussion about this post