

अतुल पवळे खडकवासला प्रतिनिधी..
हवेली तालुक्यातील आर्वी हे गाव किल्ले सिंहगडाचे पायथ्याला शिवगंगा खोऱ्यात आहे. या गावाला विहिरीतील पाण्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या भागात इंडस्ट्री मोठया प्रमाणात वाढत आहे. यावर्षी असलेल्या तीव्र उष्णतेमुळे विहिरीतील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे या भागातील गावांना पाणी टंचाई जाणवत आहे. आर्वी येथील नागरिकांना देखील टँकरने पाणी घेऊन गरज भागवावी लागत आहे. आर्वी चे सरपंच सागर नवघणे, चेतन जाधव आणि अरुण घोगरे यांनी नाम संस्थेचे नाना पाटेकर यांचेशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. नानांनी त्यांचे मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने लँडमार्क लिमिटेड कंपनीचे सी एस आर फंडातून विहीर मंजुर केली. या विहिरीचे भूमिपूजन महिलांचे हस्ते करून काम सुरु करण्यात आले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नितीन दादा वाघ तालुका समन्वयक अरुण भाऊ घोगरे,सरपंच सागर तात्या नवघणे, माजी सरपंच चेतन अण्णा जाधव, उपसरपंच सपनाताई कोंडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग आबा सणस, माजी चेअरमन बाळासाहेब घाटे, संचालक सुरेश भाऊ तावरे, नाम फॉउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, निलेश जावळकर, अरुण गिरी, मार्गदर्शक शिवाजी घाटे, दिलीप नवघणे, बाबाजी घोगरे, रामदास घोगरे, संतोष भोईटे, अनिल भाऊ घोगरे, किरण नवघणे, माऊली नवघणे, दत्तात्रेय नवघणे, पांडुरंग नवघणे दिनकर नवघणे, शंकर नवघणे, प्रवीण शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रीतम नवघणे, किरण यादव, कविताताई भोईटे, सीमाताई घोगरे, धनश्रीताई नवघणे व समस्त ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या..
Discussion about this post