जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण असल्याने नागरिकांना दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी संख येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक, संख येथे उपस्थित राहून उपोषणकर्त्यांशी सखोल संवाद साधला. ग्रामस्थांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घेत या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
ग्रामस्थांच्या मागण्यांमध्ये तथ्य असून, हा प्रश्न केवळ संखपुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाशी निगडित आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून शासन स्तरावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.









