प्रतिनिधी ।आलेगाव जि.अकोला.
सारथी महाराष्ट्राचा न्युज वृत्त सेवा
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आलेगाव येथील कथित ग्राम पंचायत भ्रष्टाचार प्रकरणी सचिवाने सीईओ कडे तक्रार केली आहे.तक्रारीमध्ये नमूद असल्याप्रमाणे श्री. जयस तायडे यांना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर ३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी पदाचा पदभार गणेश जाधव यांचेकडे सोपविला. त्यावेळी जनसुविधा निधी खात्यात ८ लाख २ हजार १५४ रुपये बाकी असल्याचे नमुद करण्यात आले .

मात्र कोणताही अर्ज ,ठराव किंवा खाते बदला संदर्भातील वैध कागदपत्र सादर न करता २२ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या संमतीशिवाय खातेबदल करण्यात आले.त्यानंतर धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून २ लाख १९ हजार रुपये अदा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
संबंधित चेकबुक हे सरपंचाच्या ताब्यात असल्याचेही तायडे यांनी नमूद केले आहे.सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीमध्ये तायडे यांनी केली आहे.









