कन्नड प्रतिनिधी :-कृष्णा करंगळे
बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांना ‘कॉपी’ पुरवणारे १८ शिक्षक तडकाफडकी निलंबित; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’सध्या महाराष्ट्रभर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.
या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य मंडळ आणि प्रशासनाकडून ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवले जात आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या अभियानाला हरताळ फासत चक्क शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कठोर पवित्रा घेतला असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या १८ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
या धडाकेबाज कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.नेमका प्रकार काय घडला?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या जैतापूर येथील ‘राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ या परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला. बारावीच्या परीक्षेदरम्यान या केंद्रावर नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
परीक्षा केंद्रावर तैनात असलेले काही शिक्षक आणि कर्मचारी स्वतः विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करत असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि परीक्षा पद्धतीच्या पवित्र्याला धक्का लावणाऱ्या या कृत्याची प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली.
सीसीटीव्ही फुटेजमधून फुटले बिंगया गैरप्रकाराची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाठकर यांनी तात्काळ या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले.
या चौकशी दरम्यान परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये काही शिक्षक आणि कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना आणि गैरप्रकारांना खतपाणी घालताना आढळून आले.
हे पुरावे समोर आल्यानंतर जिल्हादक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कठोर कारवाईचे पाऊल उचलले.१८ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले.








