प्रतिनिधी : गणेश धोबी
मलोणी (शहादा) छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर संभाव्य धोके ओळखून स्वराज्य स्थापनेची मूहूर्तमेढ रोवणारे जाणता राजा होते. येथिल एस ए मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याप्रसंगी आपले विचार मांडले.जीवाला जीव देणारे मावळे सोबत घेऊन त्यांनी तत्कालीन परिस्थितीत आपले कौशल्य पणाला लावून स्वराज्याची स्थापना केली.
आईसाहेब जिजाऊ यांच्या तालमित तयार झालेल्या शिवबांनी स्वराज्यासाठी सर्वांना एकत्र केले.प्रसंगी त्यांना विरोध करणाऱ्यांचा समाचारही त्यांना घ्यावा लागला. स्वराज्य हे जनतेचे राज्य आहे. जनकल्याणासाठी हवे असलेले सर्व प्रयत्न महाराजांनी केले.सागरी मार्गावरुन होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी पहिले आरमार उभारणारे शिवाजी महाराज हे जाणता राजा म्हणून साता समुद्रापार ख्याती प्राप्त झाले.जनतेचा राजा शिवराय म्हणूनही ते ओळखले जातात.सोनाली पाकळे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून दिली.शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनातील माहिती भाषणातून व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाकळे यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी सुलभा पवार रविकांता वसावे भरत पवार नितीन गलराह अर्चना चर्वतूर आदि उपस्थित होते.










