श्रीगोंदा तालुका, प्रतिनिधी– राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांबाबत कोणत्याही प्रकारची सूचना दिली नसताना श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात युवकांनी सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. महत्वाची म्हणजे त्यांना गावकी भावकी ओळखत नाही, पण सरपंचपद माझंच ! या एका वाक्याने ग्रामपंचायत राजकारणात तापमान वाढवले आहे. स्थानिक पातळीवर अजून पाय रोवायचे बाकी असतानाच थेट सरपंचपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर झाल्याने गावात कुतूहल, कुजबुज आणि खळबळ सुरू झाली आहे.




