
परभणी:एकीकडे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असताना, परभणी तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या वतीने खासगी वॉटर प्लांटला पाणी पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयाची माहिती मिळवण्यासाठी एका जागरूक नागरिकाने माहिती अधिकारांतर्गत अर्ज करूनही, पंचायत समिती प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई किंवा उत्तर देण्यात आलेले नाही, असा आरोप होत आहे.नेमके प्रकरण काय?मिळालेल्या माहितीनुसार, जलालपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजनेचे पाणी व्यावसायिक हेतूने (वॉटर प्लांटसाठी) वापरले जात आहे. या संदर्भात ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समितीच्या आवक विभागात माहिती अधिकारांतर्गत अर्ज सादर केला होता. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रश्न विचारले होते:खासगी वॉटर प्लांटला पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समितीची परवानगी घेतली आहे का?व्यावसायिक हेतूसाठी पाणी वापरण्याचे अधिकार कोणाचे?याबाबत कोणतीही चौकशी किंवा कारवाई करण्यात आली आहे का?प्रशासनाची अनास्था:कायद्यानुसार, माहिती अधिकारांतर्गत अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत उत्तर मिळणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित विभागाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने, तक्रारदाराने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प्रथम अपील’ अर्ज देखील पंचायत समितीकडे दाखल केला. असे असूनही, दोन महिने उलटूनही प्रशासनाने या अर्जाला केराची टोपली दाखवत मौन बाळगणे पसंत केले आहे




