कळम, जि. यवतमाळ
आदिवासी समाज संघटना, कटंगी (विभागीय शाखा – अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड) यांच्या वतीने कळम, जिल्हा यवतमाळ येथे अखिल भारतीय आदिवासी हलबा/हलबी समाज अधिवेशन उत्साहात पार पडले.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी यादवरावजी भोयर (राज्याध्यक्ष, आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी संघटना) होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत दुष्यंत नामदेवराव किरसान (अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद गोंदिया), वसंतराव पुरके (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य), प्रवीण देशमुख (संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती), क्रांतीताई राऊत धोटे (सामाजिक कार्यकर्त्या, यवतमाळ), अजय कोठेवार (सचिव, आदिवासी ह/ह समाज संघटना केंद्र कार्यालय कटंगी), गणेश इरपाची (अध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघटना नागपूर) यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अधिवेशनात आदिवासी समाजाचे वर्तमान, भवितव्य, तसेच समाजाची दशा व दिशा या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांवर व्यापक चर्चा झाली. समाज संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विविध ठराव मांडण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून अधिवेशनाची सांगता करण्यात आली. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.







