अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर
रिसोड _प्रतिनिधी सारथी महाराष्ट़ाचा वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती गंभीर बनत चालली असून अमेरिका आणि G इराण यांच्यातील संघर्षजन्य हालचालींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले आहे. इसायल कडून इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली असून मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये हवाई वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांनाही बसू लागला आहे. रिसोड येथील चार पर्यटक सध्या दुबई येथे अडकून पडले आहेत. हे पर्यटक पुणे येथून पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र अचानक उभ्या राहिलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये जेष्ठ पत्रकार भगवान निर्वान, सौ. पदमाबाई भगवान निर्वान, पवन भगवान निर्वान आणि सौ. नंदा पवन निर्वान यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित असले तरी तेथील परिस्थितीमुळे परतीच्या प्रवासाबाबत मोठी अनिश्चितता
निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. निर्बान परिवारातील सदस्य अजय निर्बान यांनी या संदर्भात आपली व्यथा मांडताना सांगितले की, ज्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत ते दुबईला गेले होते, त्या कंपनीचा करार कालच संपुष्टात आला आहे. सध्या त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही प्रमाणात माहिती मिळत असली तरी पुढील नियोजनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. नाही. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे
अनेक देशांनी आपली विमानसेवा तात्पुरती बंद केली आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिराती सहित विविध देशांमध्ये हजारो प्रवासी अडकून पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आणण्यासाठी शासनाने कोणती
माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन अडकलेल्या म नागरिकांच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी ग्र मागणी केली आहे. तसेच पु परराष्ट्र मंत्रालयाने (चएअ) तत्काळ हेल्पलाइन सुरू करून ग्र नागरिकांना मार्गदर्शन करावे, मा अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष जागतिक आवश्यक स्तरावर निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम केवळ राजकारणापुरता न राहता सर्वसामान्य मर्यादित नागरिकांवर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिसोडच्या या चार पर्यटकांच्या घटनेमुळे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेचीही कसोटी लागणार आहे. आता सर्वांचे लक्ष शासनाच्या पुढील निर्णयांकडे लागले असून, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित आणि लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी ठोस पावले हे उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




