श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
जिल्हा अहमदनगर मधील श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर परिसरात २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३ मार्च) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर सखाराम निंबाळकर (वय २५, रा. रेल्वे स्टेशन परिसर, श्रीगोंदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. सागरने शिवाजीनगर भागातील एका खोलीत दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास गळफास घेतल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र, सागरने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याप्रकरणी किरण तुकाराम निंबाळकर (वय ३४, रा. रेल्वे स्टेशन, श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू (AD) म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.




