चारी क्र. ४६/५२ येथील लाभार्थी शेतकरी बांधवांनी पालखेड डावा कालव्याचे आवर्तन मिळावे या मागणीसाठी समीर भाऊ भुजबळ यांची भेट घेतली. संबंधित चारीस नियमांनुसार पाणी सोडणे शक्य नसल्याची बाब प्रशासनाकडून पूर्वी स्पष्ट करण्यात आली होती. तरीही पिकांची परिस्थिती व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपली भूमिका मा. भुजबळ साहेबांसमोर मांडली.
यावेळी मा. छगनरावजी भुजबळ साहेबांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यांनी तात्काळ गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक त्या नियमानुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
अंदरसुल, गवंडगाव, सुरेगाव, देवठाण, खामगाव व देवळाने येथील शेतकरी बांधव या प्रसंगी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने पाठपुरावा करून दिलासा दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे शेतकरी बांधवांनी आभार मानले आहेत.





