सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
वेंगुर्ला ते सावंतवाडी मार्गावरील तुळस घाट परिसरात गोवर्धन मंदिर शेजारील मोरी गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असून वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. हे ठिकाण तीव्र वळणावर असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून मागील महिन्यात दोन ते तीन वेळा अपघात टळल्याच्या घटना घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन तुळस जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ यांनी मोरीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता पूजा इंगवळे यांना निवेदन सादर केले.
सदर मोरीची तातडीने दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.






