नितेश गट्टीवार ,चामोर्शी (गडचिरोली):दि.५मार्च तालुक्यातील भेंडाळा भागातील शेतकरी व शेतमजूर 11फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या जीआर निषेधार्थ सामुदायिक होळी दहन आंदोलन करण्यात आले होते . त्या पाठोपाठ १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनाला कांग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शासनाने 11फेब्रुवारी रोजी काढलेल्या जमीन अधिग्रहण जि आर मुळे भेंडाळा भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण येणाऱ्या काळात होण्याचा भितीने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत असल्याचा आरोप शेतकरी व शेतमजूर यांच्या कडून केला जात आहे. शासनाने काढलेल्या जीआर मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम होणार असून , योग्य मोबदला, पुनर्वसन व पर्यायी उपजिविकेसाठी हमी न देता जमिन संपादनाची प्रक्रीया राबवीली जात आहे.त्यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे.सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भेंडाळा परीसरातील शेतकरी, शेतमजूर व कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी ,कार्यकर्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





