परभणी | प्रतिनिधी
तालुक्यातील अलिबाग नगर ते कवडगाव या मार्गावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वीजेचा पोल रस्त्यावर कोसळलेल्या अवस्थेत पडून असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे संबंधित प्रशासन किंवा वीज वितरण विभागाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर पोल रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत पडलेला असल्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे हा पोल दिसून येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी संबंधित प्रशासन व वीज वितरण विभागाने तातडीने दखल घेऊन पडलेला वीजेचा पोल हटवून रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




