राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अत्यंत मोठ्या घोषणा केल्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागासाठी अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या.
अजित पवार यांच्या निधनानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली. यासोबतच अनेक महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. 1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हणजेच आता ज्या गावाची लोकसंख्या 1 हजारापेक्षा जास्त असेल तिथे कॉंक्रिट रस्त्याने जोडले जाईल. मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटर पर्यंत वाढवणार आहे. 1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या ७ कोटीपर्यंत वाढेल,असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले
2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे. 32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे. राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल. राज्य जलमाहिती केंद्र सुरु केले जाईल. नाशिक येथे या केंद्राची इमारत असेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे. 32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे. राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल. राज्य जलमाहिती केंद्र सुरु केले जाईल. नाशिक येथे या केंद्राची इमारत असेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे. 32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे. राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल. राज्य जलमाहिती केंद्र सुरु केले जाईल. नाशिक येथे या केंद्राची इमारत असेल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
मुंबईत 20 लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि 10 लाख परवडणारी घरे करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे. वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार. बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे 2027 पर्यंत करणार. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अनुसुचित जातींसाठी 2026-27 मध्ये 23 हजार 150 कोटी रुपयांची तरतूद
आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21 हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आली. अनुसुचित जातींसाठी 2026-27 मध्ये 23 हजार 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मागेल त्याला शेतपंप या अर्थसंकल्पातून मोठी घोषणा करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली. अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठी घोषणा केली आहे.





