रंगपंचमी नगरपरिषदे मार्फत खास महिलांसाठी आयोजन…..
प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.
कुरुंदवाड :- रंगपंचमी हा प्रेमाचा आणि रंगाचा सण म्हणून साजरा केला जातो. हा सण होळीच्या होलिका दहनानंतर पाचव्या दिवशी देशभर साजरा करतात. त्याचे नाव रंग आणि पंचमी असे आहे. प्राचीन हिंदू परंपरेत मूळ असलेल्या या सणाचा उद्देश चांगल्याचा वाईटावर विजय आणि वसंत ऋतुच्या आगमनाचा उत्सव आहे. या सणाचे आध्यात्मिक महत्त्व असून खेळाचा रंग वातावरणाची शुद्धता करतो. असे प्रतिपादन येथील नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी केले.
येथील नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने नगराध्यक्षा मनीषा डांगे व महिला कल्याण सभापती जुवेरिया गोलंदाज यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या तबक उद्यानात शहरातील महिलांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली सावंत होत्या. प्रमुख पाहुण्या सोनाली सावंत म्हणाल्या की, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते या दिवशी देवदेवता होळी खेळण्यासाठी आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा ऐकण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी देवदेवता सह होळी खेळण्यासाठी हवेत रंग उडवले जातात कारण देव हवेच्या रूपाने पृथ्वीवर येतात रंगाचे सूक्ष्मल कण देवांना होळी खेळण्यासाठी आमंत्रित करतात रंगपंचमीच्या दिवशी देवदेवता सह होळी खेळल्याने सर्व दुःखे आणि समस्या दूर होतात.
यंदा शहरात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी नगरपालिकेच्यावतीने नगरपालिकेच्या तबक उद्यानात होळी साजरी करण्यासाठी शहरातील महिलांना निमंत्रित केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शहरातील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून रंगपंचमी साजरी केली.
नगरसेविका संगीता कर्नाळे, जयश्री पाटील, सुजाता जाधव, आयेशा बागवान, रुक्साना बागवान, आलका मधाळे, आलका पाटील, श्रीमती विमल पोमाजे, सुनंदा आलासे यासह शहरातील बचत गट व भिशी मंडळाच्या महिलासह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.










