महोदय,
श्रीमान मी तुमच्या पेक्षा मोठा नाही ,पण मी विचार न करण्या इतका लहान पण नाही. प्रश्न असा आहे की, पहिली लोक हुंडा घ्यायची आणि घेतही असतील परंतु आजकाल एक नवीन ट्रेंड चालू आहेत. मुलगी पहायला गेल्यावर मुलीकडील लोक मुलामध्ये काही गोष्टी शोधत आहेत.
जसे. मुलगा कमीत कमी वयाचा, मुलगा सरकारी किंवा नोकरी पण पर्मनंट, त्याच घर स्वतःचे असावे, गावी राहत असेल तर शेती, शहरात असेल तर फ्लॅट, चार चाकी गाडी, मुलगा नोकरीत असेल तर पगार पत्रक मागू लागले, त्याच ठिकाणी मुलाने तुमच्या मुलीकडील लोकांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले तर राग येऊन देऊ नये…..
मुलीच्या लोकांना मुलाकडे सर्व हवे असेल तर मुलाचे वय हे 100% वाढते असणार की कारण ज्या गोष्टी तुम्ही मागत आहात त्या बाजारात फुकट मिळणार नाहीत त्यासाठी काष्ठ हे करावे लागणार.
मग मुलाकडून विचार येतो की आम्ही आज पर्यंत अस्मायुगात राहत आहे का, की आम्ही मागून खातोय का, की आमच घर गावातील लोक राशन भरून देतात का. हुंडा नक्की तेव्हा बरोबर होता की आज बरोबर आहे. मुलीकडील लोक मागतात जे सर्व मागत आहेत त्याला नक्की काय म्हणावे. याला कोणत्या प्रकारच हुंडा म्हणावे. मुलाची इकडील लोकांची अपेक्षा काय आहेत. की मुलीने तिच्या आई / वडिलांची जशी काळजी घेते तशीच माझ्या आई/ बाबांची काळजी घ्यावी, त्यात माझी फॅमिली ही लग्नानंतर तिचीच फॅमिली आहे जसे की तिच्या फॅमिलीत तिचा भाव तो इकडे दिर, तिच्या फॅमिलीत बहीण तशीच इकडे नणंद. सर्वांना सामावून घेतले पाहिजे बाकी कोणती अपेक्षा नाहीत घर सांभाळून आपल्या घरचे नंदनवन करता आले पाहिजे.
हुंडा नकोच आहे मुळात पण तुम्हीही मुलाकडील अपेक्षा कमी ठेवा ह्यात ज्याला काडी मात्र वेसण नसते अशी मुल व्यसनाधीन आणि नको त्या वाटेला जाऊ लागली आहेत. तुम्ही अपेक्षा ठेवणं बंद करा. साहजिक आहे तुमचं की तुमची मुलगी सुखात राहिली पाहिजे हे त्यात मुलगा ही तोच विचार करतो कारण त्याची पण एक बहिण असते त्यामुळे तुम्ही ज्या अपेक्षा करता अश्या मुळे मुलाचं वय 25 ते 35 पर्यंत जात आहे, त्यात फक्त मुलांचे जात नसून मुलींचे ही वय 21 ते 35 पर्यंत जात आहे. well settle /well educated.
अपेक्षा राहून गेल्या आयुष्याचा अर्धा संसार निघून जात आहे, त्यांनी संसार नक्की केव्हा करायचा.
त्यामुळे तुम्ही किंवा इतर लोकांनी आपल्या पाल्याचा वेळीच विचार करा.
सर्व बाबींचा विचार करता का मुलाने हुंडा मागू नये त्यांना तो हक्क आहे हुंडा मागायला.
पण सर्व सामाजिक मंडळींना विनंती आहे की हुंडा घेऊ नये आणि देणाऱ्याने देऊ नये. आणि ज्या ठिकाणी अपेक्षांना जास्त किंमत दिली जाते तिथे आपल्या पाल्याचा सोयरिक मुळात करूच नये…….











