प्रतिनिधी जोगेंद्र जाधव
अंबरनाथ: अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसी (MIDC) परिसरातील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीला काल लागलेली भीषण आग आज पूर्णपणे विझवण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
घटनेचा तपशील: मिळालेल्या माहितीनुसार, काल दि. ०९ मार्च २०२६ रोज सायंकाळी ५:३० वाजता श्री गणेश केमिकल कंपनीत अचानक आग लागली. केमिकलचा साठा असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले, ज्यामुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. ५:३० ते ७:०० या कालावधीत आगीची तीव्रता अधिक होती. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ आणि बदलापूर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
आज सकाळपर्यंत ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून सध्या कुलिंगचे काम पूर्ण झाले आहे. या भीषण आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.









