पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीत अजूनही जात पंचायतीचा विळखा गावागावात कायम आहे. मिरज तालुक्यातल्या नरवाड येथे जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदीवाली समाजाच्या एका कुटुंबावर जात पंचायतकडून बहिष्कृत करत समाजातून वाळीत टाकण्यात आले आहे. लग्नाबाबत तक्रार असलेल्या महिलेला मदत केल्यामुळे या कुटुंबाला गावाने वाळीत टाकले. नरवाड गावातल्याच एका महिलेचा सासरची मंडळी आणि पतीकडून छळ करण्यात येत होता. पीडित महिलेला न्याय मिळावा अशी भूमिका उत्तम पाटील आणि कुटुंबीयांनी घेतली होती. याबाबत जात पंचायतीकडे तशी मागणी देखील करण्यात आली. मात्र, जात पंचायतीकडून महिलेला मदत न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, आपण मदत करतच राहिलो याच रागापोटी जातपंचायत कडून बहिष्कृत करण्यात आल्याचा आरोप उत्तम पाटील कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तम पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर नंदीवाली समाजाकडून बहिष्कार घालण्यात आलाय, गावातल्या समाजाच्या मंदिरामध्ये देखील पाटील कुटुंबीयांवर प्रवेश बंदी आहे,इतकंच नव्हे तर समाजातील कोणताही व्यक्ती उत्तम पाटील कुटुंबीयांसमोर बोलत नाही. याशिवाय कोणत्याच धार्मिक विधी आणि इतर समारंभ पासून त्यांना लांब ठेवण्यात येत आहे. त्यामुळे पाटील कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. या घटनेनंतर मानसिक दडपणाखाली असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मिरज पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत. याबाबत तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत पाटील कुटुंबाकडून नरवाड ग्रामपंचायत तिकडे देखील तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जात पंचायत व पाटील कुटुंब यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका घेण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकारच तोडगा निघाला नाही. आता याबाबत विरोध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे त्यामुळे चामुक विचाराने या गोष्टी मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाईल असं नरवाड ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले. पुरोगामी असणाऱ्या सांगली जिल्ह्यात अजूनही जात पंचायती सारख्या गोष्टी अस्तित्वात असून त्याच्या माध्यमातून होणारी सुरूच आहे. त्यामुळे जात पंचायतीचा विळखा कधी संपणार असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे










